डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 3, 2024 10:01 AM | Assam | Flood

printer

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ३८ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. २८ जिल्ह्यांतील ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पुरामुळे मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यातील ८४ महसुली मंडळातील २ हजार २०८ गावांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे ७४ रस्ते, १४ बंधारे आणि ६ पुलांचे नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं १४० मदत शिबिरं आणि ३५९ पुनर्वसन केंद्र उघडली आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.