राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.
धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं काल रात्री एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररीत्या जखमी झाले. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे यांच्या प्रचारासाठी फिरणारी ही कार चालकाचा पाय ॲक्सिलरेटरमधे अडकल्यानं काही दुचाकी वाहनांवर आदळून उलटली. मृतांमधे चालकांचा समावेश आहे.
Site Admin | November 22, 2025 3:20 PM | Accident | Dharashiv | Thane
राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी