डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील सामन्यात भारताची दमदार सुरुवात

इंग्लंडमधल्या हेडींग्ले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद ३५९ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुल ४२ धावांवर तर कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं १०१ धावा केल्या तर कर्णधार शुभमन गिल १२७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर खेळत आहेत.