September 7, 2025 10:55 AM

views 36

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत जरीनचा पहिल्या फेरीत विजय

इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्धा निखत जरीनने काल महिलांच्या ५१ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत विजय मिळवला. वर्षभर दुखापतीमुळे बाहेर राहिलेल्या बिगरमानांकित निखतने जोरदार पुनरागमन करत ३२ व्या फेरीत अमेरिकेच्या जेनिफर लोझानोला ५-० ने हरवले. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जपानच्या युना निशिनाकाशी होईल. तर लव्हलिना बोर्गोहेनला तुर्कीच्या बुसरा इसिलदारकडून, संजूला पोलंडच्या अनेता            रायगिल्स्काकडूनही पराभव पत्करावा लागला. तर ...

July 11, 2025 7:37 PM

views 39

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिला डावात ३८७ धावा

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. ज्यो रुटनं सर्वाधिक १०४ धावा केल्या. भारतातर्फे जसप्रित बुमराहनं ५, नितीश कुमार रेड्डी आणि महंमद सिराज यांनी प्रत्येकी २, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.

July 4, 2025 2:47 PM

views 38

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केनिंग्टनमध्ये होणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज केनिंग्टनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात होईल. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतली आहे.

June 29, 2025 3:40 PM

views 67

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मानधनाने कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकत तडाखेबंद ११२ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

June 21, 2025 3:17 PM

views 33

तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील सामन्यात भारताची दमदार सुरुवात

इंग्लंडमधल्या हेडींग्ले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद ३५९ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुल ४२ धावांवर तर कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं १०१ धावा केल्या तर कर्णधार शुभमन गिल १२७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर खेळत आहेत.

June 20, 2025 1:38 PM

views 19

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिका आजपासून होणार सुरु

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषकाच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली क्रिकेट कसोटी आज इंग्लंडमधल्या हेडिंग्ले, लीड्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. नवनियुक्त भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दरम्यान, काल अनुभवी खेळाडू जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अँडरसन-तेंडुलकर चषकाचं अनावरण करण्यात आलं.  

June 6, 2025 3:27 PM

views 48

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार असून ते २०२५-२०२७ च्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन गिल कडे नेतृत्वाची धुरा आहे. २००७ पासून भारताने इंग्लंडबरोबर कसोटी सामना जिंकलेला नाही

March 1, 2025 3:37 PM

views 44

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला, तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते. 

February 12, 2025 9:53 AM

views 51

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अंतिम सामना आज होणार

भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल.

February 10, 2025 1:54 PM

views 36

भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

  भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.   कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ६० धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरनं ४४ आणि अक्सर पटेलनं नाबाद ४१ धावा केल्या.   त्याआधी इंग्लंडचा डाव सामन्यात...