खेळ

December 6, 2025 8:23 PM December 6, 2025 8:23 PM

views 19

ODI Cricket: भारताची विजयाकडे वाटचाल

विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३३ षटकांत १ बाद २०१ धावा झाल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. यशस्वी जयस्वाल ९४ धावांवर खेळतो आहे.  नाणेफेक जिंकून भारतीय संघानं क्षेत्ररक...

December 6, 2025 3:02 PM December 6, 2025 3:02 PM

views 13

पुरुषांच्या एफ आय एच ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुरुषांच्या एफ आय एच ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या बेल्जीयमच्या संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेन्नईमध्ये झालेल्या या सामन्यात खेळाची वेळ संपली तेव्हा दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघ...

December 5, 2025 8:35 PM December 5, 2025 8:35 PM

views 10

JWC 2025: भारताची आयर्लंडवर ४-० अशी मात

महिलांच्या एफआयएच हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारतानं क गटातल्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर ४-० अशी मात केली. पूर्णिमा यादव हिचे दोन गोल्स आणि कनिका सिवाच आणि साक्षी राणा यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकून क गटात पहिलं स्थान मिळवलं. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन सा...

December 5, 2025 8:33 PM December 5, 2025 8:33 PM

views 9

HCL Squash Indian Tour: अनाहत सिंह आणि वेलवन सेंथिलकुमारला विजेतेपद

चेन्नई इथं झालेल्या एचसीएल स्क्वॉश इंडियन टूर स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिनं जोश्ना चिन्नप्पा हिच्यावर मात करून अजिंक्यपदावर नाव कोरलं. ५२ मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात अनाहत हिनं जोश्नाचा ३-२ असा पराभव केला. पुरुषांच्या विभागात भारताच्या वेलवन सेंथिलकुमार यानं इजिप्तच्या आदम हवाल याला ३-२ असं...

December 4, 2025 2:34 PM December 4, 2025 2:34 PM

views 14

ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात

कतारची राजधानी दोहा इथं आजपासून  ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विश्वविजेता नेमबाज सम्राट राणा याच्या नेतृत्वाखाली १५ भारतीय नेमबाजांचा संघ सहभागी झाला आहे. या संघात मनु भाकर, सुरुची सिंह यांसारखे आघाडीचे नेमबाज आहेत.    यंदाच्या वर्षात भार...

December 3, 2025 8:26 PM December 3, 2025 8:26 PM

views 20

ODI Cricket: विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं दमदार शतक

रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५९ धावांच आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केलं. भारतानं ५० निर्धारित षटकात ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या. त्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या शतकव...

December 3, 2025 1:25 PM December 3, 2025 1:25 PM

views 162

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रायपूर इथं भारतीय थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. भारत सध्या या मालिकेत १-०नं आघाडीवर आहे. पहिला सामना भारतानं १७ धावांनी जिंकला होत...

December 1, 2025 1:36 PM December 1, 2025 1:36 PM

views 36

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात काल रांची इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात ३४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ३३२ धावांवर रोखण्यात भारताला यश आलं. त्याधी दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण...

November 30, 2025 7:19 PM November 30, 2025 7:19 PM

views 14

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं पटकावलं

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीचं विजेतेपद ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडगोळीनं पटकावलं आहे. लखनौमधे झालेल्या अंतिम सामन्यात आज त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तानाबे या जोडीचा १७-२१, २१-१३, आणि २१ -१५ असा पराभव केला.

November 30, 2025 7:01 PM November 30, 2025 7:01 PM

views 43

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५० धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३४९ ...