प्रादेशिक बातम्या

August 19, 2024 8:20 PM August 19, 2024 8:20 PM

views 14

नागपूरचं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.   या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागप...

August 19, 2024 6:54 PM August 19, 2024 6:54 PM

views 11

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण आज अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नवनियुक्त अध्‍यक्ष रविंद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री...

August 19, 2024 7:37 PM August 19, 2024 7:37 PM

views 7

महायुती सरकारच्या महिला, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी चांगल्या योजना – अजित पवार

महाराष्ट्रातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहायला हवं म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे पूर्व इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त...

August 19, 2024 6:30 PM August 19, 2024 6:30 PM

views 12

नागपूरच्या सुप्रिया मसराम आणि शिवांश मसरामची इंडिया आणि आशिया रेकॉर्डस बुकमध्ये नोंद

नागपूरच्या सुप्रिया कुमार मसराम यांनी संविधानातली ७५ कलमं तोंडपाठ म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण त्यांनी अवघ्या ६ मिनिटं २१ सेकंदांत, उपस्थितांपुढे भराभर कलमं सांगून विक्रम केला. तर त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांशनं विज्ञानाच्या पुस्त...

August 19, 2024 6:17 PM August 19, 2024 6:17 PM

views 18

मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार

रायगडमधील मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातून प्रवासी फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पावसाळ्यामुळे ही सेवा २६ मे पासून बंद ठेवण्यात आली होती. हवामान आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

August 19, 2024 5:27 PM August 19, 2024 5:27 PM

views 19

आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून आज तिघांचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून मासेमारीला गेलेली छोटी नौका आचरा हिर्लेवाडी इथल्या समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एका खलाशानं पोहत किनारा गाठल्यानं...

August 19, 2024 6:33 PM August 19, 2024 6:33 PM

views 10

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील या...

August 19, 2024 1:35 PM August 19, 2024 1:35 PM

views 16

नाशिकमध्ये देशातला पहिला एआय कुंभमेळा

देशातला पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी ...

August 19, 2024 1:44 PM August 19, 2024 1:44 PM

views 8

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचत असल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे, याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते. खेळात स्पर्धा असावी, पण ती जीवघेणी असता कामा नये, असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आव...

August 19, 2024 10:19 AM August 19, 2024 10:19 AM

views 12

राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्या तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीत तो कोसळला. रायग...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.