प्रादेशिक बातम्या

September 9, 2024 6:59 PM September 9, 2024 6:59 PM

views 11

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा

नाशिक इथं आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितलं. त्यांनी आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या विद्यापीठात अभिय...

September 9, 2024 7:04 PM September 9, 2024 7:04 PM

views 20

मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथल्या १०१ नागरिकांना निवारागृहात हलवलं आहे. धुळेपल्ली गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं. पुरामुळे भामरागड-आलापल्ली, आष्टी-मुलचेरा आणि आल...

September 9, 2024 6:34 PM September 9, 2024 6:34 PM

views 20

गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

मानधनवाढ, पेंशन आणि अन्य मागण्या प्रशासनानं मान्य न केल्यानं गडचिरोलीमधल्या हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी आज मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. ‘सिटू’ संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. या आंदोलनात हिवताप प्रतिबंधक फवारणी कामगारही सहभागी झाले होते.

September 9, 2024 6:29 PM September 9, 2024 6:29 PM

views 11

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वृत्तसंस्थेच्या बातमीत व्यक्त केली आहे.  मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसी प्रवर्गांतर्गत शिक्षण आणि नोकरीमधे दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. या निर्णय...

September 9, 2024 5:59 PM September 9, 2024 5:59 PM

views 14

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भ...

September 9, 2024 5:42 PM September 9, 2024 5:42 PM

views 6

वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं – राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख

लोकसभेत सादर केलेलं नवीन प्रस्तावित वक्फ दुरुस्ती विधेयक वक्फ बोर्डाच्या जमिनी, बोर्डाचे कार्यक्षेत्र यामध्ये हस्तक्षेप करणारं असल्याचा आरोप राज्य वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रऊफ शेख यांनी केला आहे. ते आज नागपुरात जमाते इस्लामी हिंदनं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते....

September 9, 2024 4:01 PM September 9, 2024 4:01 PM

views 6

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्य...

September 9, 2024 3:54 PM September 9, 2024 3:54 PM

views 10

यवतमाळमधे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ३६ महिला बचत गटांना ई-रिक्षाचे वितरण

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचं वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन राठोड यां...

September 9, 2024 3:48 PM September 9, 2024 3:48 PM

views 4

आयुष्यमान कार्डमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे.  ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या ४ लाख १२ हजार ३३ म्हणजेच सुमारे ५० टक्के लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेच कार्ड काढलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातल्या ५  हजार ६५२ जणांनी २८ कोटी १५ लाख ८ हजार ६८...

September 9, 2024 3:44 PM September 9, 2024 3:44 PM

views 14

राज्याच्या अनेक भागात अद्याप पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं काही कुटुंबांना निवारागृहात हलवलं आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही दिना नदीला प...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.