प्रादेशिक बातम्या

September 21, 2024 11:39 AM September 21, 2024 11:39 AM

views 9

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे; सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढीचा हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी काल पुण्यात व्यक्त केली. 'माय भारत‌'च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; असंही...

September 21, 2024 11:25 AM September 21, 2024 11:25 AM

views 19

जालना जिल्ह्यात रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात शहापूर गावाजवळ काल झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस आणि ट्रकच्या चालकांसह 3 प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

September 20, 2024 8:02 PM September 20, 2024 8:02 PM

views 8

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनी उद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा इथं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आकडेवारीनुसार या योजनेचा सर्वाधिक फायद...

September 20, 2024 7:51 PM September 20, 2024 7:51 PM

views 4

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर करण्यात आलं. संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेलं बोधचिन्ह एका राष्ट्रस्तरीय स्पर्धेद्वारे निवडलं आहे.   हे बोधचिन्ह लोणी काळभोर इथल्या ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी...

September 20, 2024 7:47 PM September 20, 2024 7:47 PM

views 15

अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे आयाेजन

देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. माळीवाडा इथल्या विशाल गणेश मंदिर परिसर ते आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. नांदेड जिल्ह्यात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिके...

September 20, 2024 7:43 PM September 20, 2024 7:43 PM

views 7

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आणि युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमधे प्रव...

September 20, 2024 7:32 PM September 20, 2024 7:32 PM

views 2

आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक- नितीन गडकरी

येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल असून आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.   ‘आयुर्वेद आणि योगविज्ञान ...

September 20, 2024 7:12 PM September 20, 2024 7:12 PM

views 13

जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर २३ जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला. ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना, समोरुन येत असलेला ट्रक या बसला धडकला.   त्यात बसचा वाहक आणि तीन प्रव...

September 20, 2024 4:00 PM September 20, 2024 4:00 PM

views 3

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर- प्रल्हाद जोशी

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.   आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्र...

September 20, 2024 3:43 PM September 20, 2024 3:43 PM

views 4

भारतीय मजदूर संघाचं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भारतीय मजदूर संघाने काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. निवृत्तीवेतन महागाई निर्देशांकाशी जोडलेलं असावं, किमान निवृत्तीवेतन ५००० करावं,जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी.   सामाजिक सुरक्षा कोड लागू करावा, पाच वर्षे झालेल्या उद्योगामधल्या कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन लागू करावं,...