प्रादेशिक बातम्या

January 3, 2025 2:14 PM

views 25

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींना शोधून काढण्याचं मुख्य काम आता उरलं आहे, असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं काल सांगितलं. तपास यंत्रणेवरील सततच्या द...

January 3, 2025 2:12 PM

views 15

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोइंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

January 3, 2025 10:30 AM

views 41

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले. मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सा...

January 3, 2025 10:25 AM

views 23

शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचं आवाहन

शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्...

January 3, 2025 10:23 AM

views 42

पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, चार हजार 849 एकर पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार

वैयक्तिक आधार कार्डाप्रमाणेच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही आधार कार्डच्या माध्यमातून युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारच...

January 3, 2025 9:57 AM

views 20

येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषेदत याबाबत घोषणा केली. या महोत्सवात मराठी चित्रपटांबरोबरच दीडशेहून अधिक देशी-परदेशी चित्रपट प्रेक्...

January 2, 2025 7:33 PM

views 24

रत्नागिरीत ‘किन्नर अस्मिता’ या तृतीयपंथीयांच्या पहिल्या स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापन

रत्नागिरी जिल्ह्यात किन्नर अस्मिता हा तृतीयपंथीयांचा पहिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला आहे. तृतीयपंथीयांना समाजाबरोबर जाता यावं, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी या गटाला सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

January 2, 2025 7:22 PM

views 32

‘महाराष्ट्र पोलीस दल’ देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचं राज्यपालांचं गौरवोद्गार

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज मुंबईत गोरेगाव इथं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचं निरीक्षण केलं आणि ...

January 2, 2025 7:14 PM

views 9

३ कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्हयातल्या बाभळेश्वर इथं कृषि विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. 

January 2, 2025 7:03 PM

views 40

मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यासाठी AIचा उपयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयात येणारे नागरिक, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षाही भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचं काम पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.