प्रादेशिक बातम्या

November 26, 2025 7:13 PM November 26, 2025 7:13 PM

views 109

महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर झाली आहे, हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम ...

November 26, 2025 7:13 PM November 26, 2025 7:13 PM

views 40

ST कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची घोषणा!

शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही  समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी  हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००- २२१- २५१ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.    विद्यार्थ...

November 26, 2025 7:13 PM November 26, 2025 7:13 PM

views 42

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी ऐवजी  २२ फेब्रुुवारी २०२६ ला घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षी अर्थात सीटीईटी...

November 26, 2025 7:12 PM November 26, 2025 7:12 PM

views 12

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआय...

November 26, 2025 7:17 PM November 26, 2025 7:17 PM

views 34

पुण्यातल्या २ मेट्रो मार्गिका आणि बदलापूर – कर्जत दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिकांना मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वेमार्गालाही मंजुरी दिली.   पुण्यातल्या ४ आणि ४ ए या नव्या मार्गिंकांसाठी एकूण ९ हजार ८५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित...

November 26, 2025 11:51 AM November 26, 2025 11:51 AM

views 12

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन

केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे. सरदार पटेलांचं मूळ गांव असलेल्या करमसाड गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून ६ डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सांगता होणार आहे. स्वच्छता, स्वद...

November 26, 2025 3:04 PM November 26, 2025 3:04 PM

views 592

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी, असं आवाहन रा...

November 25, 2025 8:35 PM November 25, 2025 8:35 PM

views 23

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती आणि अकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. शहरी जीवनमान बदलण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट आराखडा आहे, या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा विश्वास आणि मतांची ताकद आवश्यक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून द्या असं...

November 25, 2025 7:09 PM November 25, 2025 7:09 PM

views 12

नागरिकांच्या तक्रारींसाठी रत्नागिरी पोलिसांचा नवा उपक्रम

नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता याव्यात, समस्या मांडता याव्यात किंवा माहिती पाठवता यावी यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता आधुनिक तंत्राची मदत घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नसेतू नावाचा स्मार्ट एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू करण्यात आला असून, कोकण परिक्षेत्राचे विशेष ...

November 25, 2025 1:31 PM November 25, 2025 1:31 PM

views 19

यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी देशभरात  झाली आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की सुमारे ७३ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे, १९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरड धान्याची तर ७६ लाख हेक्ट...