राष्ट्रीय

August 16, 2024 8:46 PM

views 36

सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा

परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहा...

August 16, 2024 8:28 PM

views 39

आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या शोधमोहिमेत शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त

मणिपूरमधे कांगपोकपी जिल्ह्यात आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकानं एक शोधमोहिम राबवून काही शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. लॉयचिंग रिज भागात काही समाजकंटकांनी हा दारुगोळा लपवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर या संयुक्त पथकानं ही शोधमोहिम राबवली.

August 16, 2024 8:45 PM

views 21

डॉ. महिला हत्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोर्च्यात सहभाग

डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोर्चात सहभाग नोंदवला. या प्रकरणाची सुनावणी जलद व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढला होता. परवा रात्री रुग्णालयात झालेल्या तोडफोडीला भाजपा आणि डावे जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. याप्रकरणी कोलकता ...

August 16, 2024 8:15 PM

views 24

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात सामंजस्य करार

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा...

August 16, 2024 8:11 PM

views 30

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी आकाशवाणीवर ‘किसानों की बात’ हा कार्यक्रम

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार आकाशवाणीवर किसानों की बात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या  कार्यक्रमासारखा हा  ...

August 16, 2024 7:54 PM

views 29

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना ब...

August 16, 2024 7:29 PM

views 24

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील व...

August 16, 2024 3:31 PM

views 23

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. इच्छुक www.awards.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊ शकतात.  पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.

August 16, 2024 2:46 PM

views 58

गगनयान मोहिमेतलं पहिलं यान या वर्षाच्या शेवटी प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन

या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं....

August 16, 2024 1:49 PM

views 29

नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होणार आहे. या वेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या दोन राज्यांच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.