डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी आज दुपारी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज निवेदनात दिली.
दरम्यान, भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिका घेतली असून यापुढेही ती तशीच राहील, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली.