November 16, 2024 6:52 PM

views 23

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण – सभापती ओम बिर्ला

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत चौथ्या लेखा परीक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सार्वजनिक संपत्तीचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठीच केला जाईल य...

November 16, 2024 6:43 PM

views 19

कोकण विकास प्राधिकरण निर्माण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार – मुख्यमंत्री

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आपण स्वतःला मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो असं त्यांनी सांगितलं. राज्य...

November 16, 2024 6:39 PM

views 29

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक-ECI

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगानं राजकीय प्रचार जाहिरातींसाठी नियमावली ठरवून दिली आहे. यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाण...

November 16, 2024 6:34 PM

views 68

प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी BJP आणि Congress अध्यक्षांवर ECI च्या नोटिसा

महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक व...

November 16, 2024 6:24 PM

views 23

धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मुंबईतली धारावी झोपडपट्टी अदानी उद्योगसमूहाला दिलेली नसून धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत देसाईगंज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज...

November 16, 2024 8:14 PM

views 24

महिला हॉकी आशिया करंडक स्पर्धेतल्या सामन्यात भारतानं चीनला नमवलं

बिहारच्या राजगीर स्टेडियमवर सुरू असलेल्या महिला हॉकी आशिया करंडक स्पर्धेत भारतानं आपल्या वैयक्तिक चौथ्या सामन्यात आज चीनला ३-० अशा गोल फरकानं हरवत या स्पर्धेत अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे. प्रतिस्पर्धी चीनच्या संघानंही या स्पर्धेत आतापर्यंत एकही हार पत्करली नव्हती. मात्र, आजच्या सामन...

November 16, 2024 5:51 PM

views 33

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्षाहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी केली असून त्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. पन्नास हजार रुपये रोख, मानपत्र,आणि...

November 16, 2024 5:41 PM

views 28

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा भाजपाचे नेते किरण रिजिजू यांचा आरोप

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी केला. ते आज नागपूरात भाजपा कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला इतका विलंब...

November 16, 2024 5:38 PM

views 24

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी -प्रधानमंत्री

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खाजगी माध्यम संस्थेनं आयोजित केलेल्या लीडरशिप समिटमधे व्यक्त केलं. सरकार मतपेढीच्या राजकारणापासून दूर असून लोकांच्या प्रगतीचा मंत्र घेऊन काम करत आहे, देशाला विकसित र...

November 16, 2024 8:18 PM

views 34

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची आणि मेट्रो मध्ये १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्यातल्या १३२ स्टेशनचा अमृत भारत अंतर्गत विकास सुरू आहे. मुंबईत ३२० किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग...