November 15, 2024 7:59 PM November 15, 2024 7:59 PM

views 13

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. या निमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं...

November 15, 2024 7:33 PM November 15, 2024 7:33 PM

views 74

कणकवली बसस्थानकात दोन एसटी बसमध्ये चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्गमध्ये कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये चिरडल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळं काहीवेळा नागरिकांनी बस वाहतूक रोखून धरली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःकडून मृताच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत दिली. या प्रकरणी दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचं न...

November 15, 2024 7:31 PM November 15, 2024 7:31 PM

views 10

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीला जोर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित झाले आहेत. २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचं आवाहन एसएमएसद्वारे...

November 15, 2024 7:20 PM November 15, 2024 7:20 PM

views 12

विरोधक महाराष्ट्रला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची जे. पी. नड्डा यांची टीका

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सबका साथ, सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणा...

November 15, 2024 7:14 PM November 15, 2024 7:14 PM

views 12

भाजपा ‘दोन धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मताधिकाराला ‘व्होट जिहाद’ म्हणत दोन धर्मात तेढ निर्माण करत असून हे अयोग्य असल्याचा आरोप एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत ते बोलत होते.

November 15, 2024 7:05 PM November 15, 2024 7:05 PM

views 13

काँग्रेसची NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर भूमिका नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

गेल्या पाच वर्षामध्ये NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षाने भूमिका घेतली, असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

November 15, 2024 6:54 PM November 15, 2024 6:54 PM

views 15

अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल, अजित पवारांचं आश्वासन

अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले...

November 15, 2024 6:47 PM November 15, 2024 6:47 PM

views 14

राज्यात सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही – शरद पवार

राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

November 15, 2024 6:41 PM November 15, 2024 6:41 PM

views 52

सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांच...

November 15, 2024 6:41 PM November 15, 2024 6:41 PM

views 15

जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान

जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्य...