डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरकार अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ – अखिलेश यादव

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ या सरकारवर आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. धुळे शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते. महायुतीचं सरकार हे धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारं सरकार आहे, असा आरोपही यादव यांनी केला. महायुतीचं सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याचं आवाहन यावेळी अखिलेश यादव यांनी केलं. 

 

धुळे आणि मालेगावसह राज्यातल्या १२ जागांची मागणी समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे केली असल्याचं, यादव यांनी यावेळी सांगितलं.