July 31, 2025 7:20 PM

views 24

विधानसभा निवडणुकीत VVPAT आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली नसल्याचा निर्वाळा

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं, असं निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.    याबाबत दहा उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी आठ अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या....

November 24, 2024 10:34 AM

views 42

महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव साजरा करण्यात आला; त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. महाराष्ट्रात असत्याचा, घराणेशाहीचा, नकारात्मक विचारांचा पराभव झाला आहे; महाराष्ट्रानं विकसित भारताच्या संकल्पाला आणखी बळकट केल्याचं या यश...

November 23, 2024 8:03 AM

views 38

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.    २८८ विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्रं काम करणार आहेत, शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे ६ हजार ६०० पथकं नि...

November 22, 2024 7:20 PM

views 30

मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ६६.५ टक्के मतदान

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. त्यानुसार राज्यात सरासरी ६६ पूर्णांक ५ शतांश टक्के मतदान झालं. यात कोल्हापूरच्या करवीर मतदार संघात सर्वाधिक ८४ पूर्णांक ९६ शतांश, म्हणजे जवळजवळ ८५ टक्के मतदान झालं. त्याखालोखाल चिमूरमधे ८१ पूर्णांक ९५ शतांश, नवापूरमधे ८१ पूर्णांक १५ शतांश, ब्रह्मपुरी ८० पूर्णांक ५४ शतांश, तर सिल्लोड मतदार संघात ८० पूर्णांक ८ शतांश टक्के मतदान झालं.   राज्यभरात यावेळी मतदान...

November 22, 2024 7:20 PM

views 43

निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी  सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या सागर बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजपा प्रदेश कार्यालयातल्या बैठकीत घडामोडींचा आढावा घेतला.    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वाख...

November 22, 2024 3:25 PM

views 32

ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये – निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे

मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच देण्यात आलं असून, शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये, असं निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितलं. चिपळूणमध्ये मतदानयंत्रात छेडछाड करण्याच्या हेतूने काही जण थांबले असल्याची तक्रार एका पक्षकार्यकर्त्याने दाखल केली होती त्या संदर्भात लिगाडे यांनी खुलासा केला. नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्ष...

November 20, 2024 1:35 PM

views 43

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक ३० टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं. सर्वात कमी मतदान नांदेडमध्ये १३ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं.    गोंदिया, चंद्रपूर, धुळे, जालना, कोल्हापूर, नंदूरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदानाचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विधानसभा मतदारसंघांचा विचार करता आरमोरीत सर्वाधिक पावणे ३१ टक्के, अहेरीत ३० पूर्णांक ६ शतांश टक्के मतदारांनी मतदान केलं. जळगाव जिल्ह्यात पाचोऱ्यात सर्वात कमी ८ पूर्णांक...

November 19, 2024 3:24 PM

views 34

शिवसेनेच्या जयंत साठे या नेत्याच्या कक्षातून १ कोटी ९८ लाख रुपये रोकड जप्त

नाशिक शहरातल्या पाथर्डी फाटा इथल्या एका तारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जयंत साठे या नेत्याच्या कक्षातून १ कोटी ९८ लाख रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी आयोगाने सुरू केली असून ही रक्कम आपल्या व्यवसायासाठीची असल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली.

November 14, 2024 7:36 PM

views 40

केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात. ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल, असं गांधी म्हणाले. प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल, आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा काढून टाकली जाईल, शे...

November 11, 2024 3:17 PM

views 46

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती चित्ररथाचं आयोजन

स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.   नंदुरबारमध्येही केंद्रीय संचार ब्युरो आणि निवडणूक आयोगामार्फत पाठवण्यात आलेल्या मतदान प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाला. धाराशिव इथं देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं...