डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारतासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक-शिवराजसिंह चौहान

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. बिहारमधल्या मोतिहारी इथं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चेत ते आज बोलत होते. देशभरात १६ हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. उत्पादनात वाढ करणं, उत्पादन खर्च कमी करणं, आणि शेतमालासाठी दर सुनिश्चित करणं यावर ते काम करत असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. सरकार डाळी, तेलबिया यांच्या लागवडीला प्रोत्साहन देत असून शेती अधिक फायदेशीर करणं हा सरकारचा उद्देश आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी शक्ती शेती आहे, असं चौहान म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.