मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण

मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी दहा दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह सुमारे १७० लोक मारले गेले तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला मोडून काढतांना हौतात्म्य आलेले पोलिस तसंच सुरक्षा दलाच्या सैनिकांना आज राज्यभरात विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात येत आहे.