November 26, 2025 3:04 PM

views 767

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या  शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. दहशतवाद हा फक्त एखाद्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण ...

April 8, 2025 3:07 PM

views 27

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे.  तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून सध्या तो लॉस एंजेलिस मधे डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात १९९७ मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.