डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या  बैठकीत ते बोलत होते.  

वारकऱ्यांसाठी गटविमा योजना, पथकर माफी या सुविधा उपलब्ध असतील, असं ते म्हणाले.  पालखी मार्गाची दुरूस्ती, जास्तीच्या एस टी  गाड्या, पिण्याचं शुद्ध पाणी, दर्शन मंडपात हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, महाआरोग्य शिबीरं, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचं  काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.