न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर, त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबाबत आपण समन्वय साधत असून, विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या पक्षांचे केवळ एकच खासदार आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधणार असून, त्यातून संसदेचं एकमत दिसून येईल असं ते म्हणाले.
न्यायव्यवस्थेतला भ्रष्टाचार हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्दा असल्याची बाबही त्यांनी या मुलाखतीत अधोरेखित केली.