महिलांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थविषयक जागरुकता ४२ टक्क्यांनी वाढली आहे. आज नवी दिल्लीत प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या “भारताच्या आर्थिक विकासात महिलांची भूमिका” या अहवालात हे नमूद केलं आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी या अहवालाचं प्रकाशन केलं. महिला उद्योजकांना सक्षम बनवण्यात वित्तपुरवठ्याची उपलब्धता महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. आपल्या उद्योगांसाठी वित्तपुरवठा मिळवून त्याची परतफेड करणाऱ्या महिलांचं प्रमाण २०२४ मध्ये १९ पूर्णांक ४३ शतांश टक्के इतकं झालं आहे. ते २०२३ मध्ये १७ पूर्णांक ८९ शतांश टक्के इतक होतं.
Site Admin | March 3, 2025 7:44 PM | women Finance
गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांमध्ये ४२ टक्क्यांनी अर्थविषयक जागरुकता वाढली