डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक 52 धावा 39 चेंडूत केल्या, तर एनेक बॉशने 32 चेंडूत 40 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2, तर श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

 

मात्र, खेळाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने पंचांनी दुसऱ्या डावात सामना रद्द झाल्याचे घोषित केले. या निकालामुळे दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना उद्या 9 जुलै रोजी त्याच मैदानावर खेळवला जाईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.