डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला T20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत 7 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय महिलांनी केवळ 17 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले, सलामीवीर स्मृती मानधनाने 32 धावा आणि शफाली वर्माने 31 धावांचे योगदान दिलं.