डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘सकारात्मक उपाययोजनांमधून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल’

सकारात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते आज चंद्रपूरमध्ये ‘वाईल्डकॉन – २०२५’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आलेली ही  देशातली पहिलीच परिषद होती. 

वनक्षेत्रात विकास कामं होत असल्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचं ते यावेळी म्हणाले. माणसाप्रमाणेच वन्यजीवही जगायला हवेत, यासाठी इतर देशांनी काय उपाययोजना केल्या आहेत, त्याचा वन अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.