रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.
रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी ७ आणि १४ ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्रे टर्मिनस ते ओखा या दरम्यान १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल.
वेलंकनी यात्रेसाठी २७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान वांद्रे टर्मिनस ते तमिळनाडूतल्या वेलंकनीपर्यंत विशेष गाड्या चालवल्या जातील.
या सर्व गाड्यांसाठी तिकीट आरक्षण ३ ऑगस्ट रोजी सुरू होईल. प्रवाशांना आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तिकीटांचं आरक्षण करता येईल.