पश्चिम रेल्वेने पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.यात वांद्रे टर्मिनस ते वीरांगना लक्ष्मीबाई सुपरफास्ट, अहमदाबाद ते आग्रा छावणी, अहमदाबाद ते कानपूर सुपरफास्ट, तसंच अहमदाबाद ते आग्रा छावणी साप्ताहिक या गाड्यांचा समावेश असेल. या गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आले आहेत. या विशेष गाड्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.