देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात आज, तर आसाम, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या पर्वत रांगांमध्ये उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्याने दोन ते चार अंश सेल्सिअस वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.