भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं; सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते.
या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते.
डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं.