डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ वर

वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ इतकी झाली आहे. अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. सैन्य दल, भारतीय तटरक्षक दल, वायू सेना यांच्या मदतीने अद्यापही बचावकार्य सुरू असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मातीच्या ढिगाऱ्यात अद्यापही काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या शोधासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. शोधात सापडणारे मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येत आहेत.