वक्फ सुधारणा विधेयक राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं भाजपचं मत

संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेलं वक्फ सुधारणा विधेयक पूर्णपणे राज्यघटनेमधल्या तरतुदींप्रमाणे असल्याचं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं. वक्फ विधेयक राज्यघटनेच्या मूळ तत्त्वांचंच  उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केला आहे. त्याबद्दल प्रसाद बोलत होते.  या विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचा मनोदय काँग्रेसनं व्यक्त केला असून आपला लढा संसदेत आणि जनतेच्या न्यायालयातही सुरूच राहील असंही म्हटलं आहे.