डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषिमंत्री

कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कृषीमंत्री आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नारायणगांव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बनावट बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

 

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट दिली आणि तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हॅकेथॉन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. 

 

कृषी क्षेत्रासमोर नागरीकरण, औद्योगिकरण, पाण्याची कमतरता, मनुष्यबळाची कमतरता, वाढता उत्पादन खर्च ही आव्हानं आहेत. त्यामुळे किफायतशीर शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, उत्कृष्ठ बियाणं पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. एआयचा वापर, पाणी व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन, शेती कचरा व्यवस्थापन आदी विषय या हॅकेथॉनमधे मांडण्यात आले. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम सगळ्यांना मिळून करायचं आहे, असंही पवार म्हणाले.

 

चौहान यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा तसंच महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा