डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात

केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज पालघर आणि धाराशिव मध्ये सुरुवात झाली.

 

गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणं, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देणं, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता मोहीम राबविणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान पालघर आणि धाराशिव  जिल्ह्यातल्या ९० गावांमध्ये राबवलं जाणार आहे. 

 

परभणी जिल्ह्यातल्या ताड बोरगाव इथंही विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात झाली. कृषी  विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी यावेळी चित्ररथाचं उद्घाटन केलं.

 

विविध विभागाच्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित झालेल्या बियाण्याच्या वाणाची तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची माहिती शेतकऱ्यांना दिली. ही माहिती शेतीसाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. युवा शेतकरी रामेश्वर देशमुख म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा