कायदेमंडळ/ संसद, कार्यकारी मंडळ/सरकार आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभांमधे समतोल असला पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून ते आज कोच्चीच्या प्रगत विधी अभ्यास राष्ट्रीय विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. शांतता आणि सौहार्दावर आधारलेल्या जगाच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.