डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिलांनी खंबीर व्हायला हवं – एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव

महिलांनी खंबीर व्हायला हवं असं मत  एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केलं आहे. त्या नवी मुंबईच्या सानपाडा  इथं आज झालेल्या एक दिवसीय महिला साहित्यिक संमेलनात बोलत होत्या.   अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत या संमेलनात महिला साहित्यिकांचे विविध परिसंवाद, चर्चासत्रं आणि वृंदा टिळक यांचं व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी अनेक महिला साहित्यिक, रसिक उपस्थित होते.