राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच अकोला, अमरावती , बुलढाणा, कोल्हापूर, सांगली , बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमधे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.