November 12, 2024 6:38 PM | Uddhav Thackeray

printer

मविआ सत्तेत आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या प्रचारसभेत दिलं. महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नाही. महायुतीकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते दिशाभूल करत असल्याचं सांगत महाविकास आघाडीला सत्ता देण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं.