U-19 Asia Cup 2025: भारताचं मलेशियापुढं विजयासाठी ४०९ धावांचं आव्हान

१९ वर्षाखालच्या, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या सामन्यात भारतानं मलेशियापुढं विजयासाठी ४०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ४०८ धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं नाबाद २०९ धावा केल्या. त्यात १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीनं ९० तर वैभव सूर्यवंशीनं ५० धावांचं योगदान दिलं. मलेशियातर्फे महंम्मद अक्रमनं पाच गडी बाद केले.