डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 21, 2025 7:51 PM | tuberculosis

printer

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ इतकं खाली आलं आहे. याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही २५ टक्क्यानं घटलं आहे, तर उपचार मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५३ टक्क्यावरुन ९२ टक्क्यापर्यंत वाढलं आहे.