ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यात पनवेल इथं, तर ठाणे शहरात कोर्टनाका इथून तिरंगा रॅली काढली होती.
लातूर जिल्ह्यातही ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.
धुळे शहरात आणि शिरपूर इथं, जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात, यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं तिरंगा रॅली निघाली होती.