ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.
राज्यात धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, विद्यार्थी, वारकरी, माजी सैनिक, आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सोलापुरात देखील तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले.
अहिल्यानगर मध्ये कोपरगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या रॅलीची सुरवात झाली.
कोल्हापूरात देखील छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापासून तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार शाहू छत्रपती देखील रॅलीत सहभागी झाले होते.
बीड शहरात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली.