अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्नसोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.