डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते.