डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आलं.

 

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाच्या परिसरात वाकी इथला लघु बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, निळवंडे धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. कळसूबाई शिखरावरच्या मुसळधार पावसाने कृष्णावंती नदी दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यातल्या पिंपळगाव खांड आणि आंबित धरणं आधीच भरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाचा जोर होता. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने काल खेड बाजारपेठेत पाणी शिरलं होतं; मात्र काल रात्रीपासून पाणीपातळी ओसरायला सुरुवात झाली आहे. खेड नगर परिषदेमार्फत सकाळपासून स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलं असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा