डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते काल त्रिपुरा सरकारमधील 2800 हून अधिक नोकरीच्या नियुक्ती पत्रांच्या वितरण कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं त्रिपुरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन करार केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्रिपुरातील सशस्त्र गट संपुष्टात आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. मोदी सरकारनं ब्रु-रिआंग लोकांना कायमस्वरूपी निवास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि नोकरीच्या संधी देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, असंही अमित शहा यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.