देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्र्यांनी केलं कौतुक

देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना शालेय शिक्षण मिळावं यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील असं ते म्हणाले.