अरुणाचल प्रदेशात ६,००० फूट तिरंगा घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत अरुणाचल प्रदेशात सहा हजार फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अरुणाचल प्रदेश ही देशभक्तीची भूमी असून राज्याच्या सांस्कृतिक वारशात ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होतं. असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानासाठी जनतेचा उत्साह पाहून आपल्याला आनंद होत असल्याचंही ते म्हणाले

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.