राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. 

राज्यातल्या सर्व मुद्द्यावर सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार आहे. पण विरोधकांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे, त्यामुळे ते चर्चेला तयार नसल्याचं ते म्हणाले. विरोधकांनी राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प थांबवले. आमच्या सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली, ते पूर्णत्वाकडे नेले, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. 

या अधिवेशनात राज्यासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.