डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2025 7:00 PM | Test cricket

printer

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत. 

 

त्याआधी, भारतानं आपला  पहिला डाव ५ बाद ५१८ धावसंख्येवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला. गिलने एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाचीही आज बरोबरी केली. कालच्या २ बाद ३१८ धावसंख्येवरुन आपला पहिला डाव सुरु करणाऱ्या भारतानं सकाळी आपला तिसरा गडी झटपट गमावला. काल दिवसअखेर १७३ धावांवर नाबाद असलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या २ धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर मात्र कर्णधार शुभमन गिल आणि नितीशकुमार रेड्डीनं चौथ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी केली.