September 6, 2025 10:32 AM September 6, 2025 10:32 AM
22
अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – दत्तात्रय भरणे
अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९ जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख २० हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, धाराशिव जिल्ह्यात एक लाख ५० हजार ७५३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.